-
आसामच्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेल्या सैयदा अनवारा तैमूर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
४ वेळा कॉंग्रेसच्या आमदार राहिलेल्या तैमूर यांनी १९७२ सालामध्ये आपली पहिली निवडणूक लढली होती.
-
१९८८ मध्ये त्यांना राज्यसभेच्या पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती.
-
२०११ मध्ये त्यांनी 'ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (All India United Democratic Front - AIUDF)' मध्ये प्रवेश घेतला होता.
आसामबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.
-
राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: सर्वानंद सोनोवाल हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.