-
दिग्गज मल्याळम कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असणाऱ्या कवी अकीथम अचूथन नंबूथीरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
वयाच्या ९४ व्या वर्षी नंबूथीरी यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
कविता, नाटके, निबंध आणि लघुकथांसह त्यांनी ४६ हून अधिक प्रकारचे साहित्य लेखन केले आहे.
-
मल्याळम कवितेमध्ये आधुनिकतेचा परिचय निर्माण करण्यात अकीथम यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
-
१९७२ साली त्यांना 'बालदर्शनम्' साठी केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
अकीथम यांना मिळालेले पुरस्कार
-
ज्ञानपीठ पुरस्कार (२०१९)
-
पद्मश्री पुरस्कार (२०१७)
-
एझुठाचन पुरस्कार
-
वायलर पुरस्कार
-
ओडाकुझल पुरस्कार